राज्यातील एक गाव असेही आहे तिथे चोरी होत नाही.

या गावातील गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे.

महाराष्ट्रातील या अनोख्या गावाचं नाव आहे शनी शिंगणापूर

गावातल्या लोकांच्या मते, शनिदेवच या गावाचं रक्षण करतात.

यामुळेच गावातल्या कोणत्याही घरात दरवाजे दिसणार नाहीत.

गावाशिवाय इथल्या दुकानांना आणि बँकांनाही कुलूप नाही.

गावकऱ्यांची शनिदेवाच्या प्रती अतूट श्रद्धा आणि विश्वास आहे.

त्यांचा असा विश्वास आहे की शनिदेव नेहमी त्यांच्या कुटुंबाचे आणि घराचे रक्षण करतील.