वास्तुशास्त्रामध्ये घरामधील रोपे घराची ऊर्जा आणि शोभा वाढवतात. ही रोपे घरातील वातावरण सुंदर बनवतात. सोबतच सकारात्मक ऊर्जा देखील वाढते.
हिरवी रोपे घरातील लोकांचा मूड चांगला करते. मात्र घरात प्रत्येक रोप लावणे शुभ नसते. वास्तुशास्त्रात अशी काही रोपे सांगितली आहेत ती लावल्याने देवी लक्ष्मीचा कोप होऊ शकतो.
घरामध्ये वाळलेली रोपे लावणे अशुभ मानले जाते. या रोपांमुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. घरातील लोकांच्या नशिबावर परिणाम होतो.
निवडुंगाचे रोप दिसायला खूप चांगले असते. पण त्यात सुगंध नाही आणि तो व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा देत नाही. या रोपामुळे तणाव वाढू शकतो आणि आर्थिक नुकसान होऊ शकते.
चिंचेचे रोप घराच्या आसपास लावणे अशुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या रोपामुळे नकारात्मक ऊर्जा प्रभावित होते.
मेंहदीच्या रोपामध्ये औषधी गुणधर्म असतात. मात्र हे घरात लावणे शुभ मानले जात नाही. असे मानले जाते की हे रोप घरात लावल्याने मानसिक अस्वस्थता आणि अस्थिरता येते.
घराची सजावट करण्यासाठी बोन्साय रोप घरात ठेवले जाते. मात्र वास्तुशास्त्रात याला शुभ मानले जात नाही. हे रोप घरात लावल्याने आर्थिक समस्या जाणवू शकतात.