Published Sept 23, 2024
By Shubhangi Mere
Pic Credit - Social Media
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडू आज त्याचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने केलेल्या त्याच्या कारकिर्दीतील कामगिरीवर नजर टाका.
अंबाती रायडूचा जन्म 1985 मध्ये आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे झाला. रायुडूने वयाच्या 16 व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण केले होते.
रायुडूची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अवघ्या 6 वर्षात संपुष्टात आली. पदार्पणाला उशीर होऊनही रायुडू कसोटी किंवा विश्वचषकातील कोणताही सामना खेळू शकला नाही.
अंबाती रायडू अनेक सामने खेळू शकला नाही. कारण त्याचा राग होता, ज्यामुळे त्याला खूप नुकसान सहन करावे लागले.
रणजी ट्रॉफीमध्ये त्याची कामगिरी खराब होती. यावेळी त्याचे हैदराबादचे प्रशिक्षक राजेश यादव यांच्याशी भांडण झाले होते.
आयपीएल 2010 मध्ये रायुडूला मुंबई इंडियन्सने 12 लाख रुपयांना विकत घेतले आणि अंबाती संघासाठी सामना विजेता ठरला.
2007 मध्ये बीसीसीआयविरुद्ध बंड करून रायुडू चर्चेत राहिला. बीसीसीआयच्या परवानगीशिवाय तो इंडियन क्रिकेट लीगमध्ये खेळायला गेला होता.
2013 मध्ये त्याला हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. या सामन्यात त्याने 84 चेंडूत 63 धावा केल्या.
रायुडूने वयाच्या २७ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा रायुडू हा भारताचा सर्वात वयस्कर फलंदाज ठरला.
अंबाती रायडूने 55 एकदिवसीय सामन्यांमध्ये 3 शतके आणि 10 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 1694 धावा केल्या आहेत.
२०२२ आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्सच्या संघामधून शेवटचा सामना खेळला आणि निवृत्तीची घोषणा केली.