Published Nov 9, 2024
By Narayan Parab
Pic Credit - Social Media
रोजनिशी लिहण्याची सवयीने घडतील व्यक्तीमत्वात अनेक बदल
रोजनिशी लेखनाद्वारे आपल्या शोक, आनंद, चिंता किंवा इतर भावनांना व्यक्त करतो,
दिवसभरातील जे काही विचार, चिंता डायरीमध्ये लिहून मनाच्या गोंधळ शांत होतो.
विचार मांडताना लेखन प्रक्रियेत सातत्य असल्याने नवीन कल्पना आणि सर्जनशीलतेला चालना मिळते
रोजची घटना आणि विचार लिहित राहिल्यामुळे ते स्मरणात ठेवणे सोपे होतात.
रोजनिशी लिहिल्याने आपण स्वतःचे मूल्यांकन करु शकतो आणि आपल्या प्रगतीवर लक्ष ठेवू शकतो.
रोजनिशीत केवळ त्या दिवसाबद्दल लिहिले जाते असे नाही, त्यामध्ये उद्दिष्टे, योजनाही मांडता येतात आणि लक्ष्य निर्धारण करता येते
सातत्यपूर्ण रोजनिशी लेखनाने तुम्ही लक्ष्याबद्दल अधिक विचार करता त्यातून कृती घडते व त्यातूनच यश मिळते.
रोजनिशी ही तुमच्या आठवणींना उजाळा देण्याचे एक प्रमुख साधन आहे.