Published Jan 24, 2025
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
जेवण वेळेवर न जेवल्यास शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. याबाबत डॉ. वरूण कत्याल यांनी माहिती दिली आहे
केवळ वर्कआऊटच नाही तर हेल्दी डाएट आणि खाण्याची योग्य वेळ पाळणेही गरजेचे आहे
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सकाळच्या नाश्त्यानंतर सुमारे 4 तासानंतर दुपारचे जेवण करावे. यामुळे शरीराला योग्य एनर्जी मिळते
दुपारी वेळेवर जेवल्याने शरीरातील अन्न योग्य प्रकारे पचते आणि ओव्हरईटिंगची सवय न लागता वजन नियंत्रणात राहते
तुम्ही जर दुपारी जेवला नसाल तर त्याऐवजी हेल्दी स्नॅक हा उत्तम पर्याय आहे. 3 नंतर दुपारी जेऊ नये
तुमच्या दुपारच्या जेवणात लीन प्रोटीन, फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्ब्स असावेत. शुगर आणि फॅट्स पदार्थ खाऊ नयेत
सकाळी 10 ते 2 दरम्यान शरीरातील मेटाबॉलिज्म अधिक वेगात असतो, त्यामुळे या काळात उत्तम पचन होते
रोज दुपारच्या जेवणाची वेळ ही एकच ठेवा आणि नियमित याच वेळी जेवा. यामुळे शरीर उत्तमरित्या काम करते
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे आम्ही कोणताही दावा करत नाही