www.navarashtra.com

Published On 01 April 2025 By  Prajakta Pradhan

Chaitra Navratri: नवरात्रीत कापूर लावून आरती का केली जाते?

Pic Credit -   Pinterest

हिंदू धर्मात नवरात्रीचा सण विशेष मानला जातो आणि यावेळी देवी दुर्गेच्या विविध रुपांची पूजा केली जाते. 

नवरात्री 2025

नवरात्रीमध्ये देवीची पूजा केल्यानंतर आरती केली जाते. देवीच्या आरतीमध्ये तुपाच्या दिव्यासोबतच कापूरही लावला जातो.

दिव्यासोबत कापूर

काही लोकांना हा प्रश्न पडतो की, देवीच्या आरतीमध्ये कापूर का जाळला जातो. जाणून घ्या

कापूर का लावतात

नवरात्री तिथीदरम्यान, आपण कापूर जाळल्यास किंवा कापूरने आरती केली तर देवी दुर्गाशी थेट संपर्क साधण्याचा हा एक सोपा मार्ग मानला जातो.

देवी दुर्गा

नवरात्रीत कापूर जाळल्याने घरातून रोग व दोष दूर होऊन मनाला शांती मिळते. यावेळी कापूर जाळल्याने घरातील किडेही दूर होतात.

मनाला शांती

कापूरच्या धुरातून निघणाऱ्या सुगंधाने घराची सकारात्मक ऊर्जा वाढते. अशा वेळी आरती करताना कापूर वापरल्याने घर शुद्ध होते.

सकारात्मक ऊर्जा

ज्योतिषशास्त्रानुसार, कापूर जाळणे हे पर्यावरणाला शारीरिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध करण्याचे प्रतीकात्मक कृती मानले जाते

पर्यावरण शुद्ध करणे

असे म्हटले जाते की, कापूर जाळल्याने सभोवतालची नकारात्मक ऊर्जा आणि अशुद्धता यापासून मुक्त होते.

अशुद्धतेपासून मुक्त

बातमीसाठी इथे क्लिक करा