बऱ्याचदा आपण किंवा आपल्या जवळची माणसं असं म्हणतात की कसंतरी होतंय.
Img Source: Pintrest
बऱ्याचदा या कसंतरी होण्याचं नेमकं कारण कळत नाही.
मात्र हे कसंतरी होणं तुमच्या मानसिकतेवर अवलंबून असतं.
अनेकदा मन शांत नसलं की या गोष्टी आतून जाणवतात आणि मग राग चिडचिड वाढते.
भावना मनातल्या मनात दाबल्या की त्याचा त्रास वाढत जातो.
अशावेळी स्वत:ला वेळ देणं गरजेचं आहे.
कसंतरी होताना त्या समस्य़ांच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे.
स्वत: शी संवाद तुमचा जितका स्पष्टपणे असतो तितकं मानसिक गुंतागुंत कमी होते.
बऱ्याचदा त्रासिक गोष्टी डायरीत लिहून काढल्याने समस्येवर उपाय मिळतात.
कोणत्याही समस्येत तुम्ही चिडचिड करण्यापेक्षा मेडिटेशन करावं शक्य तितकं स्वत:ला शांत ठेवावं.