दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाच्या सणांपैकी एक मानला जातो. यावेळी गणपती बाप्पा, देवी लक्ष्मी आणि कुबेराची पूजा केली जाते
हिंदू धर्मात तुळशीला खूप पवित्र मानले जाते. दिवाळीमध्ये तुळशीच्या मंजिरीचे उपाय करणे खूप फायदेशीर मानले जाते.
दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीला तुळशीची मंजिरी अर्पण करायला हवी. यामुळे घरामध्ये आणि जीवनात सुख समृद्धी येते. संकट दूर होऊन इच्छा पूर्ण होतात.
दिवाळीच्या दिवशी विष्णूंना तुळशीची मंजिरी अर्पण करावी. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबातील वातावरण आनंदी राहते.
दिवाळीच्या दिवशी तुळशीची मंजिरी घरातील तिजोरी किंवा पैसे ठेवण्याच्या जागी लाल कपड्यात बांधून ठेवावी. असे केल्याने घरामध्ये देवी लक्ष्मीचे आगमन होईल.
तुळशीची मंजिरी गंगाजलात मिसळून पूर्ण घरात शिंपडा त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील आणि नकारात्मक ऊर्जा दूर होईल
दरवर्षी कार्तिक अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. यावेळी कार्तिक अमावस्या 20 आणि 21 ऑक्टोबर रोजी आहे त्यामुळे 20 ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी केली जाईल