Published Feb 26, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - Social Media
भारतीय संस्कृती ही ऋतुचक्र आणि आयुर्वेदावर आधारित आहे.
कान टोचणं हे फक्त सौंदर्य वाढवत नाही तर त्यामागे शास्त्रीय कारण देखील आहे.
याबाबत आरोग्यतज्ज्ञ मानसी मेहेंदळे यांनी सविस्तर सांगितलं आहे.
पुर्वीच्या काळी साथीचे रोग मोठ्या प्रमाणात वाढायचे .
यावर आयुर्वेदात उपाय सांगितले होते. त्यातील एक उपाय म्हणजे कर्णच्छेदन.
आयुर्वेदात असं म्हटलं आहे की, कानाच्या पाकळीला टोचलं की तीन नसा एकत्रित येतात.
कानाच्या पाकळीच्या मधोमध टोचल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
कानाच्या पाकळीला प्रेस केल्याने महिलांचा अनियमित मासिकपाळीचा त्रास कमी होतो.
कानाच्या पाकळीला प्रेशर पॉईंट असतात ते दाबल्याने डिप्रेशन मानसिक ताण तणाव कमी होण्यास मदत होते.
पुर्वीच्या काळी पुरुष देखील कानात बिग बाळी घालण्याचं कारण हेच होतं.
बिग बाळी घातल्याने पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथींचं आरोग्य सुधारण्यास मदत व्हायची.