हरतालिकेच्या दिवशी कोणत्या गोष्टीचे दान करावे

Life style

23 August, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

हरतालिकाचे व्रत सुहासिनींसाठी खूप खास मानले जाते. यावेळी हे व्रत मंगळवार, 26 ऑगस्ट रोजी आहे.

कधी आहे हरतालिका 

मान्यतेनुसार देवी पार्वतीने कठोर तपश्चर्या करुन भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त केले होते. या दिवशी व्रतासोबत दानालाही महत्त्व आहे.

दानाचे महत्त्व

या दिवशी सुहासिनींनी सिंदूर, टिकली, बांगड्या, पैंजण, कंगवा आणि काजळ या गोष्टींचे दान करावे.

सौभाग्याचे साहित्य

सुपारी आणि सुपारीची पाने

सुपारी आणि सुपारीच्या पानांना शुभ मानले जाते. व्रताच्या दिवशी याचे दान करणे शुभ मानले जाते. 

वस्त्र आणि फळ

या दिवशी गरजूंना कपडे आणि हंगामी फळे दान केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. 

अन्नाचे दान

हरतालिकेच्या दिवशी गहू, तांदूळ, डाळ आणि मिठाई यांसारख्या गोष्टींचे दान करावे. यामुळे घरात अन्नधान्याची कमतरता भासत नाही

पूजेचे साहित्य

हरतालिकेच्या दिवशी पूजेचे साहित्य म्हणजे धूप, कापूर, दिवा, नारळ, कलश इत्यादी गोष्टीचे दान करणे शुभ मानले जाते. 

गाय दान आणि कपडे दान

या दिवशी गाईला चारा देणे किंवा गाय दान करणे शुभ मानले जाते. तसेच गरजूंना कपड्यांचे दान करावे.