Published August 1, 2024
By Harshada Jadhav
सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण मोबाईल वापरतात.
मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे आपल्या डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो.
.
मोबाईल फोनमधून निघणारा प्रकाश डोळ्यांसाठी आणि रेटिनासाठी धोकादायक ठरू शकतो.
मोबाईल प्रकाशामुळे थकवा, डोळ्यांमध्ये कोरडेपणा, खाज सुटणे, अंधुक दृष्टी आणि डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात.
फोन वापरतांना तो डोळ्यांपासून कमीत कमी किती अंतरावर असावा याबद्दल अनेकांना माहिती नसते.
बहुतेक युजर्स त्यांचे स्मार्टफोन डोळ्यांपासून सुमारे 8 इंच अंतरावर ठेवतात, जे डोळ्यांसाठी हानिकारक आहे.
तुमचा मोबाईल तुमच्या चेहऱ्यापासून किमान 12 इंच किंवा 30 सेंटीमीटर अंतरावर ठेवावा.
स्मार्टफोनचा वापर करताना पापण्या उघडझाप केल्याने डोळे ओले राहतील, ज्यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ टाळता येईल.