Published Jan 22, 2025
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
भारत हा ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध देश आहे.
भारतात आजही शेकडो वर्षे जुन्या इमारती अस्तित्वात आहेत.
ताजमहाल, कुतुबमिनार, लाल किल्ला, हुमायूंचा मकबरा, इमामबारा, हवा महाल, आमेर किल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले
पण या सर्व इमारतींमध्ये एक गोष्ट समान आहे.
प्रत्यक्षात कोणत्याही इमारतीत सिमेंट किंवा इतर कोणत्याही रसायनाचा वापर करण्यात आलेला नाही.
आज घरे आणि मोठमोठ्या इमारती बांधण्यासाठी सिमेंटसोबत वाळूचा वापर केला जातो.
पूर्वीच्या काळी मोठमोठे महाल बांधण्यासाठी कोणत्या गोष्टी वापरल्या जात होत्या?
मुघल शासकांपासून ते देशातील राजपूत घराण्यापर्यंत सर्व किल्ले दगडांनी बनलेले आहेत.
पूर्वीच्या सर्व ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये तुम्हाला दिसेल की तिथे दगडांचा वापर केला जात होता.
दगडांना चिकटवण्यासाठी किंवा पायाभरणीसाठी विशिष्ट प्रकारची सामग्री तयार केली जात असे.
ही विशिष्ट प्रकारची सामग्री तयार करण्यासाठी वेगवेगळे पदार्थ वापरले जात होते.
ज्यामध्ये प्राण्यांच्या हाडांची भुकटी, दगड, बांबू, धातू, चुन्याची भुकटी, झाडाची साल, उडीद डाळ पावडर यांचा समावेश होता.
हे मिश्रण राजवाडा, किल्ला किंवा इतर कोणत्याही इमारतीच्या बांधकामात दगड चिकटवण्यासाठी वापरले जायचे.