Written By: Trupti Gaikwad
Source: Yandex
ज्योतिष शास्त्रानुसार,सूर्य हा राजसी ग्रह आहे.
जेव्हा सूर्य पत्रिकेत कमकुवत असतो, तेव्हा मान सन्मान समाजात फारसा मिळत नाही.
ज्योतिष शास्त्र सांगतं की, व्यवसायात वृद्धी होण्यासाठी पत्रिकेतील रवि बळकट असणं महत्त्वाचं आहे.
पत्रिकेतील रवि बळकट करण्यासाठी रोज सकाळी सूर्याला अर्ध्य द्यावं.
नियमितपणे आदित्य हृदय स्तोत्र आणि गायत्री मंत्राचा जप करा.
घराच्या दारावर तांब्याचं सूर्यचिन्ह पूर्व दिशेला लावावं आणि त्यांची पूजा करावी.
आपल्या माता पिता आणि गुरु यांचा आदर करा आणि त्यांना योग्य मान-सन्मान द्या.