भारतात 45°C सहन होते, पण युरोपमध्ये 40°C चाच कहर का?

Science Technology

4 July 2026

Author: प्रज्ञा घोगळे - निकम

40°C हे तापमान भारतात असो किंवा युरोपमध्ये, ते सारखेच असते. फरक हा तापमानात नसून त्या देशांच्या हवामानाशी जुळवून घेतलेल्या पायाभूत सुविधांमध्ये असतो.

40°C म्हणजे दोन्हीकडे सारखेच

Picture Credit: Pinterest

युरोपमधील अनेक रस्ते, रेल्वे आणि इमारती थंड हवामान लक्षात घेऊन बांधल्या गेल्या आहेत. त्यामुळे अचानक आलेल्या तीव्र उष्णतेचा त्यांच्यावर अधिक परिणाम होतो.

युरोपमध्ये नुकसान जास्त का?

Picture Credit: Pinterest

भारतात अनेक राज्यांमध्ये दरवर्षी 40–45°C किंवा त्यापेक्षा जास्त तापमान अनुभवले जाते. त्यामुळे रस्ते, रेल्वे आणि इतर सुविधा जास्त उष्णता सहन करतील अशा प्रकारे तयार केल्या जातात.

भारताची तयारी वेगळी

Picture Credit: Pinterest

– रेल्वे रुळ वाकण्याचा धोका वाढतो. – पूल आणि धातूची संरचना उष्णतेमुळे प्रसरण पावते. – विमानतळावरील रनवेवरही परिणाम होऊ शकतो. – शेतजमिनी कोरड्या पडतात आणि जंगलातील आगीचा धोका वाढतो.

फक्त रस्तेच नाही, 'या' गोष्टींवरही होतो परिणाम

Picture Credit: Pinterest

हवामान खात्यात 40°C दाखवत असले तरी उन्हात रस्ते, गाड्यांचे छत आणि धातूचे भाग 60 ते 80°C किंवा त्याहून अधिक तापू शकतात. त्यामुळे नुकसान होण्याचा धोका वाढतो.

सूर्यामुळे पृष्ठभाग जास्त तापतो

Picture Credit: Pinterest

भारतातही तीव्र उष्णतेच्या काळात काही ठिकाणी रस्ते मऊ पडणे, रेल्वे रुळांवर वेगाचे निर्बंध लावणे आणि वीजेच्या मागणीत वाढ होणे अशा घटना घडतात. मात्र अशा परिस्थितीचा सामना करण्याचा अनुभव अधिक असल्याने परिणाम अनेकदा मर्यादित राहतो.

भारतातही नुकसान होऊ शकते

Picture Credit: Pinterest

40°C हे दोन्हीकडे समान तापमान आहे. मात्र बांधकामाचे साहित्य, हवामानानुसार केलेले नियोजन, सलग उष्णतेचा कालावधी आणि स्थानिक पायाभूत सुविधा यांमुळे युरोप आणि भारतातील परिणाम वेगळे दिसतात.

निष्कर्ष

Picture Credit: Pinterest