Written By: Mayur Navle
Source: Instagram, iStock
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात 28 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे.
यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला सौदी दौरा रद्द केला आहे.
सौदी द्वारा रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले.
भारत आणि पाकिस्तान मधील सिंधू जल करार हा तातडीने थांबवण्यात आला आहे.
अटारी बॉर्डर बंद करण्यात आला असून, या मार्गाने भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 1 मेपूर्वी परत जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सर्व पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा भारताने रद्द केला आहे.
तसेच भारतातील पाकिस्तानी नागरिकांनी 48 तासात भारत सोडावा अशी सूचना देखील सरकारने केली आहे.