Published Dec 21, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
भारतात 4 लाखांहून अधिक लोक भीक मागून आपला संसार चालवत आहेत.
पश्चिम बंगाल हे असे राज्य आहे जिथे सर्वाधिक लोक भीक मागतात.
मध्य प्रदेशातील इंदूर शहर भिकारीमुक्त होण्याच्या मार्गावर आहे.
इंदूरमध्ये भिकाऱ्यांना भिक्षा देणाऱ्या लोकांवरही एफआयआर दाखल केला जाणार आहे.
1 जानेवारी 2025 पासून हे नवीन नियम लागू होणार आहेत.
लहान मुलेच नाही तर वृद्ध देखील भीक मागताना पकडले गेले तर त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला जाईल.
मध्य प्रदेशातील सांची हे भिकारीमुक्त शहर आहे.
सक्षमीकरण मंत्रालयाने एक राष्ट्रीय पोर्टल आणि मोबाईल ॲप देखील सुरू केले आहे.
ॲपवर भीक मागणाऱ्या लोकांची ओळख पटवून अपडेट केली जाते.