पावसाचे पाणी लगेच पिता येते का?

Life style

04 JULY, 2025

Author: दिपाली नाफडे

नैसर्गिक सर्वच गोष्टी शुद्ध असतात. पण पावसाचे पडणारे पाणी तुम्ही डायरेक्ट पिऊ शकता की नाही?

पावसाचे पाणी

Picture Credit: iStock

ढगातून जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ते पाणी खूपच शुद्ध असते. पण धूळ, प्रदूषण आणि बॅक्टेरियामुळे हे नेहमी पिणे योग्य नाही

म्हणजे काय?

शहरी भागात पावसाच्या पाण्यात वायू प्रदूषण, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड मिक्स होते, त्यामुळे हे दूषित होऊ शकते

प्रदूषण

पावसाचे पाणी जमीन, छत आणि भांड्यांमध्ये साठल्यावर त्यात बॅक्टेरिया, व्हायरस निर्माण होतात आणि पोटाच्या समस्या होतात

बॅक्टेरिया

पावसाचे पाणी साठविण्यासाठी स्वच्छ टाकी, भांड्यांचा उपयोग करावा. पहिले 10-15 मिनिट्स पाणी वाहू द्या

साठवणे

पावसाचे पाणी पिण्याआधी उकळून घ्या, जेणेकरून त्यातील बॅक्टेरिया मरतील आणि त्रास होणार नाही

शुद्धता

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील पावसाचे पाणी हे अधिक शुद्ध आढळते, त्यामुळे पिऊ शकता

ग्रामीण भाग

दूषित पाणी पिण्याने पोटात जंत, उलटी, टायफॉईडसंबंधित आजार उद्भवू शकतात आणि प्रतिकारशक्ती कमी होते

धोका

पावसाचे शुद्ध पाणी हे खनिजमुक्त आणि शुद्ध असून त्वचा आणि केसांसाठी चांगले ठरते

फायदे

पावसाचे पाणी सुरूवातील शुद्ध असते मात्र ते पिण्याआधी उकळून पिणे अधिक सुरक्षित आहे

काळजी