सध्या संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलाच्या नामघोषात तल्लीन झाला आहे.
Img Source: Instagram
आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील वारकरी पंढरीच्या वारीस निघतात.
पंढरीच्या वारीत रिंगण पाहायला मिळते. मात्र या रिंगणाचा इतिहास आणि महत्व काय?
रिंगण दोन प्रकारचे असते. एक म्हणजे उभे रिंगण आणि दुसरे म्हणजे गोल रिंगण.
कितीतरी किलोमीटर वारकरी चालत असतात, ज्यामुळे ते थकतात. त्यांचा हा क्षीण घालवण्यासाठी रिंगण खेळले जाते.
पूर्वी ईश्वराची सेवा आणि धर्माचे रक्षण म्हणून मराठा सरदार वारीत यायचे. यातूनच रिंगणाची परंपरा सुरू झाली.
हजारो वर्षांपासून चालत आलेल्या पायी वारीचे रुपांतर जेव्हा पालखी सोहळ्यात झाले तेव्हा रिंगणाची सुरुवात झाली.
या रिंगण सोहळ्यात संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज अश्वावर विराजमान असतात अशी श्रद्धा आहे.