www.navarashtra.com

Published Jan 17,  2025

By  Trupti Gaikwad

उखाणा घेण्याची ही प्रथा कशी सुरु झाली, हे जाणून घेऊयात.

Pic Credit -  iStock

मराठी कुटुंबामध्ये लग्नात उखाणा घेण्याची प्रथा खूप जुनी आहे.

उखाणा 

कोणत्याही सत्यानारायणाची पुजा किंवा लग्नकार्य उखाणा घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. 

उखाणा

उखाणा घेण्याच्या या प्रथेबाबत 'किस्सोंकी दुनिया' या इन्टाग्राम अकाउंटवरुन ओमकार सावंत यांनी माहिती दिली आहे.

प्रथा 

असं म्हणतात की, आता सारखं पुर्वी नवरा नवरी आणि घरच्यांची ओळख झालेली नसायची.

काय  आहे कारण ?

लग्नानंतर मुलगी हळूहळू संसारात रमायची. नवऱ्याला एकेरी हाक मारणं तिला शक्य नसायचं.

परंपरा 

त्यामुळे त्या मुलीला नवरा, सासु सासरे यांच्या विषयी सर्वांसमोर बोलून दाखवणं शक्य नव्हतं.

वरिष्ठांचा आदर 

म्हणूनच संस्कृती परंपरा, रोजच्या घडमोडीतील प्रसंग, म्हणी जोडून काव्यात्मक पद्धतीने उखाणा घेण्याची प्रथा सुरु झाली.

संस्कृती

या उखाणा घेतल्याने वरिष्ठांना राग येण्याचं कारण नसायचं आणि नवऱ्याचं नाव घेता आलं याचं त्या मुलीला समाधान मिळायचं.

समाधान

मेडिटेशन करण्याची योग्य वेळ आणि किती वेळ करावे?