Published Jan 17, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
मासिकपाळीच्या काळात महिलांनी डोक्यावरुन अंघोळ करु नये असं म्हटलं जातं.
पुर्वापार चालत आलेल्या काळापासून मासिक पाळीला विटाळ समजलं जातं.
बऱ्य़ाचदा असं देखील म्हणतात की, मासिकपाळीच्या काळात डोक्यावरुन अंघोळ केल्याने जास्त रक्तस्त्राव होतो.
याबाबत तज्ज्ञांनी समज आणि गैरसमज सांगितले आहे.
तज्ज्ञांच्या मते मासिक पाळीत केस धुतल्याने काही नुकसान होत नाही.
मासिकपाळीच्या काळात केस धुतल्याने फायदाच होतो.
मासिकपाळी सुरु असताना शरीर स्वच्छ ठेवणं महत्त्वाचं असतं.
याकाळात महिलांची चिडचिड जास्त होते, त्यामुळे केस धुतल्याने मेंदू शांत राहतो.
मासिक पाळी सुरु असताना दिवसातून दोन वेळा स्वच्छ अंघोळ करणं गरजेचं असतं.