Published Dev 13, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
अत्यंत प्रसिद्ध असणारे स्ट्रीट फूड म्हणजे पाणीपुरी, मसालेदार पाणीपुरीचं नाव घेतलं तरीही तोंडाला पाणी सुटतं
अनेक जण आठवड्यातून किमान 2-3 वेळा पाणीपुरी खातात, मात्र हे शरीरासाठी नक्कीच नुकसानदायी ठरू शकतं
पाणीपुरीत अधिक प्रमाणात मीठ असते, ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते आणि हृदयावर दबाव पडतो
पाणीपुरीत असणारे मसाले आणि चटण्यांमुळे पोटात जळजळ, गॅस, अपचन आणि अॅसिडिटी होते
पाणीपुरीचे सेवन अल्सरच्या रूग्णांसाठी त्रासदायक ठरू शकते. यात मसाले, चटणी आणि कधीकधी घाणेरड्या पाण्याचा समावेश असतो
पाणीपुरीमध्ये अधिक कॅलरीज असून रोज याचे सेवन केल्याने लठ्ठपणासाठी कारणीभूत ठरू शकते
.
ज्या व्यक्ती पाणीपुरीचे अतिसेवन करतात त्यांना डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते ज्यामुळे डोकंदुखी होते
.
चटणी आणि पाण्यातील साखरेमुळे पाणीपुरी ही डायबिटीसच्या रुग्णांसाठी त्रासदायक ठरू शकते
.
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही
.