Published Oct 26, 2024
By Divesh Chavan
Pic Credit - Social Media
जैवविविधतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या सह्याद्री घाटाला युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळालेली आहे.
सह्याद्री घाटाची निर्मिती कोटी वर्षांपूर्वी गोंडवाना भूमीच्या विभाजनात झाली, ज्यामुळे येथे अनेक दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी प्रजाती तयार झाल्या आहेत.
साधारण ४,००० वनस्पती प्रजातींनी समृद्ध असलेला हा प्रदेश औषधी वनस्पती, मसाले आणि अनेक देशी वनस्पतींचा प्रमुख स्त्रोत आहे.
सिंहशेपटा माकड, निलगिरी तहर अशा दुर्मिळ प्रजाती येथे सापडतात, ज्यांचे अस्तित्व फक्त सह्याद्रीच्या पर्यावरणात आहे.
सह्याद्री घाट पावसाळ्यात पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांना रोखत असल्याने संपूर्ण भारताच्या हवामानावर त्याचा मोठा प्रभाव आहे.
सह्याद्रीत विविध आदिवासी समुदायांच्या संस्कृती, भाषा, आणि पारंपरिक ज्ञानामुळे इथली जैवविविधता अधिक संवर्धली गेली आहे.
कृष्णा, गोदावरी आणि कावेरीसारख्या प्रमुख नद्यांचा उगम येथे होतो, ज्यामुळे लाखो लोकांचे पाणी व शेतीसाठी यावर अवलंबून असतात.
सह्याद्री घाटातील ट्रेकिंग, धबधबे, आणि मनमोहक डोंगरांनी भरलेला परिसर पर्यटकांना आवडतो.