आजची 26 जुलै म्हटलं की अनेकाना आठवतो तो भयंकर पाऊस.
Img Source: Pinterest
याच दिवशी मुंबईतील मिठी नदीला पूर आला आणि मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले.
26 जुलै 2005 रोजी मुंबईत केवळ 24 तासांत 944 मिमी पावसाची नोंद झाली.
मुसळधार पावसामुळे मुंबईचं जनजीवन पूर्णपणे ठप्प झालं होतं. रेल्वे, बस सेवा बंद, रस्ते जलमय झाले.
अनेक मुंबईकर ऑफिस, शाळा किंवा रेल्वेत अडकले. हजारो लोकांना रस्त्यावरच रात्र काढावी लागली.
या दिवशी वीज पुरवठा खंडित झाला. तसेच, मोबाईल नेटवर्क देखील ठप्प झाले.
मुंबईत उद्भवलेल्या पुरामुळे 1000 पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला.
पूरस्थितीमुळे अनेक शाळा आणि कॉलेज बंद ठेवावे लागले.