Published Jan 17, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
मात्र फक्त पाण्याने शरीराला हायड्रेट ठेवता येत नाही. असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं.
दिवसभरात शरीराला तीन ते चार लीटर पाण्याची गरज असते.
मात्र फक्त पाणी नाही तर पाण्याबरोबर इतर आवश्यक घटक शरीराला मिळणं देखील महत्त्वाचं आहे.
एक लीटर पाण्यामध्ये आर्धा लिंबू पिळून हे पाणी प्यावं.
लिंबामध्ये पोटॅशिअम असल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.
व्हिटामीन सीची मात्रा मुबलक असल्याने लिंबू पाण्याच्या सेवनाने शरीरातील PH संतुलित राहतो.
जेवणानंतर एक ग्लास पाण्यात सब्जा टाकून प्यायल्याने पचनसंस्था सुधारते.
आम्लपित्तामुळे वाढलेली उष्णता जिऱ्याच्या पाण्याने कमी होते.
बडीशेपचं पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होतं. त्वचेचं पोषण होण्यास मदत होते.