Published on 31 march, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
पृथ्वीचे सरासरी तापमान सातत्याने वाढत आहे, ज्यामुळे उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होत आहेत.
चक्रीवादळे, पूर, दुष्काळ, आणि जंगलातील आगी अधिक प्रमाणात होत आहेत.
अंटार्क्टिक भागातील बर्फ वेगाने वितळत असून समुद्राची पातळी वाढत आहे.
समुद्राची पातळी वाढल्यामुळे किनारी भागातील शहरे आणि बेटे जलमय होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
अनेक वनस्पती आणि प्राणी हवामानातील बदल सहन करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांचा नाश होत आहे.
तापमानवाढ आणि अनियमित पाऊस यामुळे शेती आणि अन्न उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे.
हिमनग वितळल्याने आणि पर्जन्यमानातील बदलांमुळे अनेक भागांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण होत आहे.