www.navarashtra.com

Published Jan 27,  2025

By  Mayur Navle

या चुका करू शकतात तुमच्या रिलेशनशिपचा The End !

Pic Credit -  iStock

एकमेकांशी खुलेपणाने संवाद न साधणे, मनातील भावना दडपून ठेवणे, यामुळे नात्यात दुरावा येतो.

संवादाचा अभाव

खोटं बोलणं, फसवणूक किंवा लपवाछपवी केल्याने विश्वास कमी होतो आणि नातं कमकुवत होतं.

विश्वासाचा तुटवडा

जोडीदाराकडून अती अपेक्षा ठेवणे किंवा त्यांना सतत बदलण्याचा प्रयत्न करणे नात्यात ताण निर्माण करतात.

जास्त अपेक्षा

नात्यात वेळ कमी केल्यास जोडीदाराला दुर्लक्षित वाटू शकते.

वेळ न देणे 

वाद झाले तरी त्यावर वेळेवर तोडगा न काढल्यास नाराजी वाढते. यामुळे नातं उध्वस्त होऊ शकतं.

मतभेदांवर तोडगा न काढणे

जोडीदाराची इतर लोकांशी तुलना केल्याने त्यांचं आत्मविश्वास कमी होतो आणि  त्यांना अपमानित वाटतं.

तुलना करणे

जोडीदाराच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधनं घालणे किंवा त्यांना नेहमी संशयित नजरेने पाहणे नकारात्मक परिणाम करते.

व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधनं

नेहमी स्वतःच्या गरजा, भावना, किंवा मतांना महत्त्व देऊन जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष केल्यास नातं कमकुवत होतं.

स्वतःला प्राधान्य देणे

काकडीपासून बनवा टेस्टी आणि हेल्दी ब्रेकफास्ट, वाचा ही रेसिपी