Written By: Mayur Navle
Source: Yandex
उन्हाळ्यात अनेकदा टायर फुटण्याच्या घटना घडत असतात.
तुमच्या काही चुका वाहनाच्या टायरची लाईफ कमी करू शकतात. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
टायरमध्ये हवा जास्त किंवा कमी असली तर टायर झिजतो आणि लवकर खराब होतो.
जास्त वेगामुळे टायर अधिक गरम होतात आणि त्याची पकड कमी होते. परिणामी त्यांचे लाईफ कमी होते.
वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त वजन टाकल्यास टायरवर ताण येतो आणि ते लवकर झिजतात.
चुकीची अलाइनमेंटमुळे टायर एकाच बाजूने झिजतो, ज्यामुळे टायरचे आयुष्य लक्षणीय घटते.
अचानक आणि जोरदार ब्रेक लावल्याने टायरवर अनावश्यक ताण येतो आणि ते झिजतात.
खराब रस्त्यांवरून वारंवार जाणं टायरच्या रचनेवर परिणाम करतं.