Written By: Trupti Gaikwad
Source: Yandex
समर्थांनी मनाचे श्लोक लिहिण्यामागे एक आख्यायिका सांगितली जाते.
याबाबत मधुरा वेलणकर या मराठी अभिनेत्रीने सविस्तर माहिती सांगितली आहे.
समर्थांनी रामजन्मोत्सव सज्जन गडावर साजरा करण्याची प्रथा सुरु केली.
एका वर्षी रामजन्मोत्सवाला पाहिजे ती मदत लोकांकडून मिळाली नाही.
आयत्या वेळी रामजन्मोत्सव कसा करायचा हा प्रश्न समर्थ शिष्यांना पडला.
यावर समर्थांनी सांगितले की, चिंता करु नका.
त्यावेळी "गणाधीश जो ईश" पासून प्रारंभ करुन 205 श्लोक एका बैठकीत सांगितले.
शिष्यांना सांगितले की हे श्लोक म्हणत गावोगावी जा, लोक मदत करतील.
त्यानंत अगदी तसंच झालं उत्सावासाठी सगळी तयारी शक्य झाली.