Published March 13, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - Google
हिंदू धर्मात विवाहानंतर मुलीचा सासरी गृहप्रवेश होतो.
घरी येणाऱ्या नववधूला लक्ष्मीचं रुप मानलं जातं.
तांदळाने भरलेलं माप हे भरभराटीचं आणि समृद्धीचं प्रतीक म्हटलं जातं.
देव्हाऱ्यातील लक्ष्मीला तांदळामध्ये विराजमान केलं जातं.
तांदूळ हे शुभ्रतेचं आणि पावित्र्याचं प्रतिक मानलं जातं.
जेव्हा नववधू माप ओलांडून गृहप्रवेश करते तेव्हा घर सुख शांतीने नांदूदेत असा अर्थ आहे.