रडताना डोळ्यातून अश्रू का येतात?

Life style

03 August, 2025

Author:  नुपूर भगत

जेव्हा आपण दुःखी, त्रासलेले, आनंदी किंवा भावूक होतो, तेव्हा आपल्या मेंदूतील "लिंबिक सिस्टम" सक्रिय होते.

भावना 

Picture Credit: Pinterest

लिंबिक सिस्टममधून "हायपोथॅलॅमस" नावाचा भाग अश्रू ग्रंथींना  संदेश पाठवतो की डोळ्यातून पाणी सोडायचे आहेत.

मेंदू सिग्नल पाठवतो

Picture Credit: Pinterest

मेंदूचा सिग्नल मिळताच डोळ्यांच्या वरच्या भागातील अश्रू ग्रंथी कार्यरत होतात आणि ते पाणी निर्माण करतात.

अश्रू ग्रंथी

Picture Credit: Pinterest

हे पाणी म्हणजे अश्रू, ते डोळ्यांत साचायला सुरुवात करतात. जेव्हा त्याची मात्रा वाढते, तेव्हा ते डोळ्यांतून वाहू लागतात.

अश्रू डोळ्यांत साचतात

Picture Credit: Pinterest

हे अश्रू फक्त पाणी नसतात, तर त्यात एन्झाईम्स, प्रोटीन आणि हार्मोन्स असतात, जे भावनात्मक तणाव कमी करतात.

रासायनिक घटक

Picture Credit: Pinterest

अश्रू वाहिल्यामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि मनाला थोडा दिलासा मिळतो.

तणावातून आराम

Picture Credit: Pinterest

 अश्रू येणं ही मेंदू आणि शरीराची एक स्वाभाविक प्रतिक्रिया आहे, जी भावना व्यक्त करणारी प्रक्रिया आहे.

 नैसर्गिक प्रतिक्रिया

Picture Credit: Pinterest