Written By: Trupti Gaikwad
Source: Yandex
हिंदू धर्मात कोणत्याही शुभकार्याची सुरुवात नारळ वाढवून केली जाते.
याचं नेमकं शास्त्रीय कारण काय आहे याबाबत वेडींग घर या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन माहिती देण्यात आली आहे.
पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पाहता, नारळाची झाडं किनारी प्रदेशांमध्ये मुळे घट्ट रोवून ठेवतात.
या कारणामुळे मातीची धूप आणि वाळूचं झिरपण कमी होतं.
नारळाच्या झाडाचा प्रत्येक भाग उपयोगी आहे. म्हणूनच नारळाला ‘कल्पवृक्ष’ म्हणतात.
नारळाचे औषधी गुणधर्म देखील आहेत. आयुर्वेदात नारळाला मोठं महत्त्व आहे.
यामुळेच नारळाला धार्मिक कार्यात देखील शुभ मानलं जातं.