Written By: Trupti Gaikwad
Source: Yandex
महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना आई हातावर कायमच दही देते.
यामागे धार्मिक बाजू आहे त्याचप्रमाणे शास्त्रीय कारण देखील सांगितलं जातं.
ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक मानला जातो.
बाहेर जाताना मन स्थिर रहावं म्हणून हिंदू धर्मानुसार हातावर दही साखर देतात.
याबरोबर यामागे अललेलं वैज्ञानिक कारण म्हणजे, दही शरीरात थंडावा निर्माण करतं.
महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असताना ताण आणि भिती असते.
त्यामुळे शरीरात अतिरिक्त उष्णता तयार होते.
दही साखर खाल्याने हृदयाला थंडावा मिळतो आणि ताण कमी होण्यास मदत होते.