Published March 13, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - Google
शरीराचा आणि मनाचा खूप जवळचा संबंध आहे असं सांगितलं जातं.
मानसिक तणाव असल्यास त्याच परिणाम शरीरावर होतो.
याचबरोबर शरीराला योग्य पोषण मिळालं नाही तर मानसिक आरोग्य खराब होतं.
सतत कंटाळा येणं किंवा काहीही काम करण्याची इच्छा होत नाही असं असल्यास यामागे काही कारणं आहेत.
याबाबत आरोग्यतज्ज्ञ मानसी मेहेंदळे यांनी माहिती दिली आहे.
अपचनाचा त्रास वारंवार होत असल्यास शरीरात आळस जास्त भरतो.
जर शरीरात पाण्याचं प्रमाण कमी असेल तर शरीर थकतं आणि सतत झोप येते.
यासाठी रामबाण उपाय म्हणजे सकाळी पोट साफ व्हायला हवं.
रोज सकाळी सूर्यप्रकाशात थोडा वेळ चाला.
दिवसभरात तीन ते चार लीटर पाणी पिणं आवश्यक आहे.