बाहेरील वातावरणाशी जुळवून घेताना अनेकजण आजारी पडतात.
सध्या पावसाळ्यात अनेकांना सर्दी खोकला आणि ताप यासारखे आजार होत आहे.
या तापामुळे तोंड कडू होणं किंवा जीभेची चव जाणं हे जाणवतं.
तापामुळे तोंड कडू होण्याची काही कारणं आहेत.
तापात शरीरात बॅक्टेरिया सक्रिय होतात त्यामुळे जीभेवर कडवट तयार होतं.
तापामध्ये डिहायड्रेशन वाढतं त्यामुळे तोंड कोरडं पडतं आणि चवेसंबंधी तक्रारी वाढतात.
तापासाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांमुळे तोंडात कडवटपणा जाणवतो.
रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे अशक्तपणा जाणवतो त्यामुळे कडवटपणा जीभेवर येतो.
तोंडाचा कडवटपणा घालवण्यासाठी लिंबूपाणी प्या.
थोड्या थोड्या अंतराने फळांचा रस, सूप घ्या यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होईल.