Published Jan 08, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - Pinterest
महिलांना दागिन्यांचं खूप वेड असतं विविध पद्धीतीच्या दागिन्यांनी महिलांचं सौंदर्य खुलून दिसतं.
सोने चांदीच्या दागिन्यांमुळे भारतीयांचं सौंदर्य कायमच खुलून दिसतं.
असं असलं तरी तुम्हाला माहितेय का हिंदू शास्त्रात सोन्याचे जोडवी आणि पैंजण घालू नये असं म्हटलं जातं.
हिंदू शास्त्रात असं म्हटलं जातं की महिलांनी पायात सोन्याचे जोडवी आणि पैंजण घालणं अशुभ असतं.
सोन्याचे पैंजण आणि जोडवी पायात घातल्याने देवदेवतांचा अपमान होतो असं म्हटलं जातं.
सोनं हा धातू गुरु ग्रहाचं प्रतिनिधीत्व करतो. तसंच सोनं हे भगवान विष्णूंना प्रिय आहे.
सोन्याच्या दागिन्यांना लक्ष्मीचा अंश मानला जातो. त्यामुळे पायात सोन्याचे दागिने नसावेत असं म्हणतात.
ज्योतिष शास्त्रानुसार पायात सोन्याचे दागिने घातल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो असं म्हटलं जातं.
शास्त्रीयदृष्ट्या पाहायला गेलं तर पायात सोन्याचे दागिने घातले तर शरीरातील उष्णता वाढते.
चांदी शरीरातील अतिरिक्त उष्णता शोषून घेते, त्य़ामुळे चांदीचे पैंजण आणि जोडवी घालावीत असं सांगतात.