Published Nov 25, 2024
By Prajakta Pradhan
Pic Credit - istock
हिंदू धर्मात लग्नादरम्यान अनेक विधी आणि प्रथा पार पाडल्या जातात. यापैकी एक म्हणजे ग्रहप्रवेशाच्या वेळी नववधूंनी तांदळाचा कलश ओलांडणे.
लग्नानंतर मुली जेव्हा आपल्या पतीच्या घरी जातात तेव्हा त्यांना ग्रहप्रवेशाच्या वेळी त्यांच्या पायाने तांदळाचे भांडे ओलांडावे लागते.
.
नवीन नवरी तांदूळ भरलेले भांडे खाली टाकते तेव्हा त्यातील तांदूळ घरात विखुरले जातात. असे म्हटले जाते की, तांदूळ विखुरल्याने त्या घरात समृद्धी येते.
असे मानले जाते की जर नववधूने घर सोडण्यापूर्वी तांदूळ भरलेल्या भांड्यावर ठोठावले तर ते नेहमी आनंद आणि समृद्धी आणते.
नववधूला ग्रहप्रवेशाच्या वेळी तांदळाचा कलश तिच्या सरळ पायाने औलांडावा लागतो. उजवा पाय सकारात्मकतेचे प्रतिनिधित्व करतो, म्हणून सरळ पायाने कलश ओलांडणे शुभ मानले जाते.
ग्रह प्रवेशावेळी मुख्य प्रवेशद्वाराजवळ तांदूळ भरलेला कलश ठेवला जातो. असे मानले जाते की, हा कलश ओलांडून नववधू घरात येते तेव्हा घरात सकारात्मकता येते.
हिंदू धर्मात स्त्रीला देवीचे रूप मानले जाते, त्यामुळे तांदूळ भरलेला कलश ओलांडल्यास त्या घरात आर्थिक लाभ होतो असे म्हटले जाते.
असे मानले जाते की ग्रहप्रवेशाच्या वेळी नववधूने तांदळाचा कलश टाकल्यास त्या घरातील सर्व सदस्यांना जीवनात यश प्राप्त होते.