Published Feb 05, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
हिंदू विवाह पद्धतीत हळदी संमारंभाला मोठं महत्त्व आहे.
लग्नाच्या आधी मुलीला नवऱ्यामुलाची उष्टी हळद लावण्याची प्रथा फार जुनी आहे.
याबाबत कीस्सोंकी दुनिया या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन माहिती सांगितली आहे.
नवऱ्यामुलाला लावलेल्या हळदीच्या भांड्यातील काही थोडीशी हळद मुलीच्या घरी पाठविली जाते.
या हळदीला उष्टी हळद म्हणतात.
उष्टी हळद मुलीला लावण्याचं कारण म्हणजे, पुर्वीच्या काळी छोट्याशा कारणांवरुन लग्न मोडली जायची.
लग्नकार्य सुरळीत पार पडेल ना अशी चिंता मुलीच्या घरच्यांना असायची.
जर नवऱ्या मुलाकडून उष्टी हळद आली म्हणजे सर्वकाही सुरळीत आहे असा विश्वास मुलीच्या घरच्यांना मिळायचा.
लग्न झाल्यानंतर सुख दुख वाटून घ्यावी लागतात याची शिकवण देणारी ही उष्टी हळद असते, असं म्हणतात.