आजकाल लोक गाड्यांना वेगळा लूक देण्यासाठी विविध बदल करतात.
Picture Credit: Pinterest
मोठे टायर लावणे, सस्पेंशन बदलणे आणि गाडीच्या बॉडीमध्ये बदल करणे हे सामान्य झाले आहे. पण, हे बदल महागात पडू शकतात.
Picture Credit: Pinterest
तुम्ही तुमच्या गाडीत बदल करणे तुम्हाला महागात पडू शकते. याचा विम्यावरही परिणाम होतो.
Picture Credit: Pinterest
पंजाबमधील एका महिंद्रा थार मालकासोबत अलीकडेच असे घडले आहे.
Picture Credit: Pinterest
रस्ता अपघातानंतर त्या व्यक्तीचा ४ लाख रुपयांचा विम्याचा दावा नाकारण्यात आला आहे.
Picture Credit: Pinterest
महिंद्रा थारच्या मालकाने आपल्या गाडीत अनेक बदल केले होते, ज्याची माहिती विमा कंपनीला दिली नव्हती.
\Picture Credit: Pinterest
जेव्हा गाडीचा अपघात झाला, तेव्हा मालकाने नुकसानीच्या भरपाईसाठी विम्याचा दावा दाखल केला.
Picture Credit: Pinterest
तपासणीअंती वाहनाची मूळ रचना आणि तंत्रज्ञान बदलण्यात आले होते जे पॉलिसीच्या अटींच्या विरोधात होते.
Picture Credit: Pinterest
गाडीमध्ये केलेल्या बदलांमुळे तिचे स्वरुप पूर्णपणे बदलले होते आणि या बदलांची माहिती आधी देण्यात आली नव्हती.
Picture Credit: Pinterest
परिणामी, गाडी मालकाला अपघाताच्या नुकसानीची भरपाई स्वत:च्या खिशातून करावी लागली.
Picture Credit: Pinterest