प्रत्येक पावसात मुंबईची तुंबई का होते?

Lifestyle

26 May, 2025

Author: Mayur Navle

पहिल्याच पावसात मुंबईतील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबईची तुंबई 

Picture Credit: Pexels 

पण प्रत्येक पावसात मुंबईत पाणी का साचते? चला याबद्दल जाणून घेऊया.

कारण

मुंबईतील ड्रेनेज सिस्टीम जुनी असून, अनेक भागांमध्ये पाणी योग्य वेगाने वाहून जाण्याची व्यवस्था नाही.

जुनी ड्रेनेज सिस्टम

झपाट्याने वाढणाऱ्या झोपडपट्ट्या व बेकायदेशीर बांधकामांमुळे देखील पाणी साचत आहे

अनियोजित शहरीकरण

नाल्यांमध्ये प्लास्टिक आणि कचरा टाकल्याने ते तुंबतात व पावसाचे पाणी वाहून जात नाही.

कचर्‍याची अयोग्य विल्हेवाट 

अनेक ठिकाणी नाले अरुंद किंवा अपुरे आहेत, जे मुसळधार पावसाचा भार सहन करू शकत नाहीत.

अपुरे नाले 

हरित क्षेत्रे आणि मोकळ्या जमिनी कमी झाल्यामुळे पावसाचे पाणी मुरण्याऐवजी रस्त्यावर साचते.

सिमेंटचा अतिरेक