Published March 13, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
तिन्ही सांजेला झोपून राहू नये असं आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं.
असं म्हणतात दिवेलागणीला लक्ष्मी घरात येते त्यामुळे झोपून राहणं हे अशुभ आहे.
संध्याकाळी झोपू नये याबाबत जशी धार्मिक कारणं आहेत तशी शास्त्रीय कारणं देखील आहेत.
याबाबत आरोग्यतज्ज्ञ मानसी मेहेंदळे यांनी माहिती दिली आहे.
वैद्यकीय शास्त्र असं सांगतं की, सूर्यास्तानंतर शरीरातील अग्नी मंद झालेला असतो.
संध्य़ाकाळच्या वेळी झोपल्याने कफप्रकोप होतो आणि पचनशक्ती मंदावते.
या सगळ्यामुळे भूक लागत नाही आणि अपचनाचा त्रास होतो.
याबरोबर अवेळी झोपल्यामुूळे झोपेचं चक्र बिघडतं.