तुमच्याकडे Term Life Insurance का असले पाहिजे?

Business

27 JULY, 2025

Author:  मयूर नवले

हल्लीच्या धावपळीच्या आयुष्यात तुमच्या गुंतवणुकीसोबतच टर्म लाईफ इन्शुरन्स असणे देखील महत्वाचे आहे.

टर्म लाईफ इन्शुरन्स

Img Source: Pinterest

चला जाणून घेऊया, टर्म लाईफ इन्शुरन्स इतके महत्वाचे  का आहे?

का महत्वाचे?

विमाधारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला एकरकमी रक्कम मिळते, जी त्यांच्या गरजांसाठी उपयोगी ठरते.

कुटुंबाचे आर्थिक संरक्षण

स्वस्त प्रीमियम

इतर प्रकारच्या जीवन विम्यांच्या तुलनेत टर्म प्लॅनचे प्रीमियम कमी असतात, त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीही ते सहज घेऊ शकतो.

मोठी रक्कम

कमी प्रीमियममध्येही मोठ्या रक्कमेचे विमा कवच मिळू शकते – उदा. 50 लाख ते 1 कोटी रुपये.

आर्थिक अडचण कमी होते

घरांतील कमावत्या व्यक्तीचे निधन झाल्यास, गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा इतर कर्जाचे भार टर्म इन्शुरन्समुळे कमी होते.

कुटुंबाच्या सुरक्षितेबाबत विश्वास

आयुष्यात अनिश्चितता असली तरी, आपल्यामागे कुटुंब सुरक्षित राहील  ही खात्री मिळते.

तरुण वयात जास्त फायदा

तरुण वयात टर्म इन्शुरन्स घेतल्यास प्रीमियम खूपच कमी असतो आणि दीर्घकालीन संरक्षण मिळते.