Published Feb 13, 2025
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
कच्चे आलं अधिक खाल्लं तर शरीरावर नकारात्मक परिणाम होताना दिसून येतो. पोटात जळजळ, अपचन, गॅस निर्माण होतो
कच्चे आलं हे उष्ण असून जास्त सेवन केल्यास गॅस, पोट फुगणे, पोटातून पेटके येण्यासारख्या समस्या उद्भवतात
ज्या व्यक्तींना सतत छातीत जळजळ अथवा अॅसिड रिफ्लेक्स होत असेल त्यांनी कच्चे आलं खाणं त्रासदायक ठरू शकते
कच्चे आलं जास्त खाल्ल्याने पचनक्रिया वेगाने वाढते आणि त्यामुळे मलत्याग असामान्य स्वरूपात होऊन शरीरात कमकुवतपणा जाणवतो
काही लोकांना कच्च्या आल्यामुळे अॅलर्जी होऊ शकते, ज्यामुळे त्वचेवर लाल डाग, रॅश, खाज समस्या येऊ शकतात
गरोदरपणात महिलांनी कच्चे आले अजिबात खाऊ नये. याच्या उष्णतेने उलटी वा मळमळ त्रास होऊ शकतो
पित्ताशयात ज्यांना खडा झालाय अशा व्यक्तींनी कच्च्या आल्यापासून दूर रहावे. अन्यथा पोटदुखीचा त्रास उद्भवतो
कच्चे आले जास्त खाल्ल्यास कोरडेपणाची समस्या निर्माण होते, यात डोळे सुकणे, लालसरपणा, असुविधा निर्माण होणे याचा समावेश होतो
आले नेहमी शिजवून खावे, काढा, सूप, सुकी पावडर या स्वरूपात त्याचा उपयोग करून घ्यावा
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही