By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
Published 14 Feb, 2025
उन्हाळ्यात अनेकांना पित्ताचा त्रास वारंवार जाणवतो.
पित्त वाढल्याने सतत चक्कर येणं, डोकेदुखी आणि मळमश होणं अशी समस्या निर्माण होते.
काहींना उन्हमुळे तर काहींची पित्तप्रवृती असल्याने हा त्रास जाणवतो.
पित्ताचा त्रासावर तुप हे घरचा वैद्य म्हणून काम करतं.
आरोग्य तज्ज्ञ डॉ. ऋचा पै यांनी तुपाचं महत्त्व सांगितलं आहे.
तुपाच्या सेवनाने पित्ताचा त्रास कमी होतो.
तुपाच्या सेननाने पचन क्रिया सुरळीत होते.
सकाळी उठल्यावर गरम पाण्यात दोन चमचे तुप टाकून प्यायल्याने अन्न पचतं.
जर पित्तप्रकृती असल्यास तर नस्यचिकित्सा केल्याने खूप आराम पडतो.
चपाती भाकरी किंवा वरण भातात तूप टाकून खाल्याने गुडघ्यांना कॅल्शिअम मुबलक मिळतं.