Published Nov 08, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
लिंबू आल्याच्या पाण्यामुळे काय होतं
लिंबू आल्याचे पाणी पिण्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. न्यूट्रिशनिस्ट प्रीती त्यागी यांनी काही महत्त्वाची माहिती दिली आहे
लिंबात विटामिन बी६, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम आणि फायबर असून आल्यात अँटीऑक्सिडंट्स गुण अधिक आढळतात
लिंबू आणि आल्याच्या पाण्याच्या सेवनाने पचनक्रिया मजबूत होते. तसंच पोटदुखी, अपचनाचा आणि गॅसचा त्रास कमी होतो
.
तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आलं लिंबाचे पाणी नियमित प्यावे. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते
.
आलंलिंबाच्या पाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर जातात आणि बॉडी डिटॉक्स अधिक चांगल्या पद्धतीने होते
प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही रोज सकाळी उपाशीपोटी आलं आणि लिंबाच्या पाण्याचे सेवन करणे योग्य ठरते
दिवसभर एनर्जी टिकून राहण्यासाठीही तुम्हाला आलं-लिंबू पाण्याचा उपयोग होऊ शकतो. याचा रोज सकाळी वापर करावा
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही