आषाढी आणि कार्तिकी एकादशीला हिंदू धर्मात मोठं महत्व आहे.
हिंदू धर्मानुसार असं सांगितलं जातं की, आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हणतात.
देवशयनी एकादशी म्हणजे या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेत जातात.
यादिवशी आपल्या माऊलीला भेटायला वारकरी चालत जातात.
सामाजिक दृष्टीकोनातून पाहिल्यास आषाढी एकादशीला घाटमाथ्यावरील वारकरी जास्त जाताात.
आषाढात बऱ्यापैकी शेतीची कामं झालेली असतात त्यामुळे समूहाने ही मंडळी वारीला जातात.
त्याचप्रमाणे कार्तिकी एकादशी म्हणजे देवउठनी एकादशी होय.
या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रातून जागे होतात, असे मानले जाते.
कार्तिकी एकादशीला वारी जाणारे बहुसंख्य कोकणस्थ असातात.
कार्तिक महिन्यात भाताचं पिकं आलेलं असतं, सुगीचे दिवस असतात.
त्यामुळे या महिन्यात परमेश्वराचे आभार मानण्यासाठी कोकणस्थ वारकरी कार्तिकी एकादशीची वारी करतात.