By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
Published 22 Feb, 2025
महाराष्ट्रीय लग्नात वधु आणि वरांच्या डोक्याला मुंडावळ्या बांधल्या जातात.
पुर्वीच्या काळी लग्नात मोगऱ्याच्या फुलांच्या मुंडावळ्या बांधल्या जात असतं.
लग्नात वधु वरांना बांधण्यात येणाऱ्या मुंडावळ्यांमागे शास्त्रीय कारणं देखील आहेत.
मुंडावळ्या का बांधतात याबाबत वेडींग घर या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन याबाबत माहिती दिली आहे.
लग्न कार्यात वधु आणि वर हे उत्सवमुर्ती असतात.
लग्नाच्या धावपळीमुळे शारीरिक थकवा येतो.
सततच्या जागरणीचा त्रासामुळे डोकेदुखीचा त्रास होऊ नये यासाठी डोक्याला पट्टीसारख्या मुंडावळ्या बांधतात.
मुंडावळ्या बांधल्यामुळे डोक्यावर विशिष्ट दाब येतो.
पुर्वीच्या काळी मोगऱ्याच्या फुलांच्या मुंडावळ्या बांधायचे.
मोगऱ्याच्या सुगंधाने वधु आणि वरांना दिवसभर ताजेतवाने वाटायचे.