Written By: Mayur Navle
Source: Yandex
अनेकदा लोकं प्रेमाची कबुली देण्यास घाबरत असतात. यात धाडसी मुलांचा देखील समावेश आहे. पण ते कोणत्या कारणांमुळे घाबरतात?
समोरच्या व्यक्तीने नकार दिला तर आत्मसन्मान आणि इगो दुखावला जाईल, ही भीती मनात असते.
जर मैत्रीण असलेल्या मुलीला प्रपोज केलं आणि तिने नकार दिला, तर मैत्रीही बिघडेल का? हाच मोठा प्रश्न सतावत असतो.
प्रपोज करण्यासाठी योग्य वेळ आणि ठिकाण निवडायचं कसं? हे ठरवताना अनेकदा गोंधळ उडतो.
मनात प्रेम असलं तरी ते योग्य शब्दांत मांडता येईल का?ही भीती अनेकदा असते.
समोरची मुलगी आधीच कोणाशी रिलेशनशिपमध्ये असेल का, याची खात्री नसल्यामुळे घाबरायला होतं.
ती खूप सुंदर, हुशार किंवा लोकप्रिय असेल आणि मी तिच्यासाठी योग्य नसेल, असं वाटणं हे एक कारण असू शकतं.