By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
Published 19 Feb, 2025
पुर्वीच्या काळी मुलीचं लग्नानंतर आडनाव बदलण्याची प्रथा होती.
ही प्रथा रुढ होण्याचं खरं कारण काय, याबाबत किस्सोंकी दुनिया या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन सांगितलं आहे.
हल्लीच्या काळात नाव तेच ठेवून फक्त मुलीचं आडनाव बदललं जातं.
काही ठिकाणी आडनाव ही बदलत नाही, आडनाव बदलण्याची पद्धत व्यक्ती सापेक्ष आहे.
मात्र या नाव आणि आडनाव बदलण्याच्या प्रथेचं खरं कारण जाणून घेऊयात.
असं म्हणताता की चार आश्रमांपैकी आपण गृहस्थाश्रमाची निवड केलेली आहे.
गृहस्थाश्रमात कुटुंबाबरोबर राहून काम आणि मोक्ष प्राप्त करावा लागतो असं म्हटलं जातं.
असं म्हणतात की मुलीचं लग्न झाल्यावर सासुनंतर ती घराची आधारस्तंभ होते.
पतीनंतर त्याच्या संपत्तीची ती मालकीण असते.
पत्नीला कागदोपत्री पतीच्या संपत्तीतील सगळे अधिकार मिळावेत यासाठी तिचं आडनाव बदललं जायचं.
पत्नी पतीची आर्धांगीनी असते म्हणूनच पुर्वीच्या लग्नानंतर मुली पतीचं आडनाव लावत होत्या.
यात कमीपणाचे कोणतेही कारण नव्हते. एखाद्या कुटुंबासाठी त्यांचं आडनाव ही प्रतिष्ठेची बाब असते.
लग्नानंतर मुलीचा गृहुप्रवेश झाल्यावर सासरच्या आडनावावर तिचा समान हक्क असतो.