Published Oct 07, 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
कधी तरी रडून घेणं सुद्धा महत्वाचं का असतं?
कधीतरी रडून घेणं हे आपल्या मेंटल हेल्थसाठी खूप महत्वाचे असते.
रडल्याने आपल्या आतील भावनांची वाट मोकळी होते.
रडून घेतल्याने आपल्या शरीरातील स्ट्रेस हार्मोन कमी होते ज्यामुळे आपला मानसिक तणाव कमी होतो.
.
आपल्याकडे रडणे म्हणजे खंबीर नसण्याची लक्षण आहे असे मानले जाते. परंतु हे चुकीचे आहे.
.
जर तुमच्या जवळील व्यक्ती रडत असेल तर त्याला आधार द्या, ज्यामुळे तुमच्यातील नातं अधिक दृढ होईल.
अनेक जण आपला मित्र रडताना दिसला की त्याला चिडवत किंवा रडू बाई म्हणतात. यामुळे रडणारी व्यक्तीचे मानसिक खच्चीकरण होऊ शकते.
जेव्हा आपण रडतो तेव्हा आपल्या डोळ्यात पान जमा होते, जे आपल्या डोळ्यातील घाण बाहेर काढते.
एकदा का रडून घेतले की आपले दुःख हलके होते. यामुळे आपली विचार करण्याची क्षमता अधिक चांगली होते.