By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
Published 14 Feb, 2025
लग्न ठरल्यावर पहिली पत्रिका देवाला आणि मगच नातेवाईकांना देण्यात येते.
घरात देव आणि देव्हारा असताना ही पहिली पत्रिका ही गावच्या मंदिरातच ठेवण्याची प्रथा आहे.
लग्नाची पहीली पत्रिका ठेवण्यासाठी आपल्या मुळ गावीच का जायचं हा अनेकांना प्रश्न पडतो.
याबाबातत 'किस्सों की दुनिया' या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन माहिती सांगण्यात आली आहे.
कामानिमित्ताने बरेच जण मूळ गाव सोडून विविध ठिकाणी स्थलांतरीत होतात.
त्यामुळे आपल्या कुळाचं रक्षण करणारी कुलदैवत आणि ग्रामदेवतेची भेट आपल्या मूळ गावी होते.
लग्न आणि संसार म्हणजे आपल्या कुळाला पुढे घेऊन जाणं आहे.
त्यामुळे आपल्या कुलदैवतेबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गावच्या मंदिरात लग्नपत्रिका ठेवतात.